सातारा – ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने माण, खटाव तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असून सद्य परिस्थितीत जिल्ह्यात 75 गावे व 400 वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माण व खटाव तालुक्यातील 59 गावे व 353 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात 20 विहिरी व 30 बोअरवेल प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने अनेक ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला होता. सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टॅंकरची गरज निर्माण झाली होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असली तरी हा पाऊस फक्त पश्चिम भागात झाल्याने अद्यापही अर्धा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. काही दिवसांपासून पावसाने पूर्ण दडी मारल्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
माण तालुक्यात 45 गावे, 329 वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सातारा, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, पाटण, कराड तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये 75 गावे व 400 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एक लाख 13 हजार 912 नागरिक आणि 65 हजार 273 पशुधनाची तहान
या पाण्यावर अवलंबून आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली. माण तालुक्यात 45 गावे 329 वाड्या, खटाव 14 गावे, 24 वाड्या, फलटण 8 गावे, 47 वाड्या, 16 वाड्या, कोरेगाव 6 गावे, वाई 2 गावे अशा 75 गावे 400 वस्त्यांवर टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात शासकीय 9 आणि 67 खासगी टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे गौरव चक्के यांनी सांगितले.
निखिल महाजन ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
तर, सरदार उधम हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे, तर मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीला “द काश्मीर फाइल्स’साठी तर पंकज त्रिपाठीला “मिमी’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
माण, खटावमध्ये टंचाईची दाहकता
माण, खटाव तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी प्रशासनाला टॅंकरद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे. पावसाने हजेरी न लावल्यास आगामी काळात भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या फक्त पाण्याची टंचाई असली तरी आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास माण, खटावसह उत्तर कोरेगावमध्ये चारा छावण्या सुरु करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.