मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकणारे सत्तांतर महाराष्ट्रासह अवघ्या देशाने पाहिले. त्यानंतर सुरु झालेली न्यायालयीन लढाई देखील अवघ्या देशाने पाहिली.आज दुपार नंतर या सत्तासंघर्षाचा निकाल येणार आहे. तत्पूर्वी दावे प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु झाल्याचे पाहायला मिळते. जर १६ आंनदार अपात्र ठरले तर उर्वरित २४ देखील अपात्र होणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर उर्वरित २४ देखील अपात्र होतील आणि हे सरकार कोसळेल असं राऊत यावेळी म्हणालेत. तसेच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना देखील राऊत यांनी यावेळी टोला लगावला. अपात्रतेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचे देखील नाव आहे. ते अपात्र झाल्यास गद्दारांचा शिंदे गट संपून जाईल असही राऊत यावेळी म्हणाले.
नरहरी झिरवळ न रिचेबल
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे मोबाईल बंद असल्याचं सांगितलं जात असून निकालाला अवघे काही तास उरले असताना झिरवळांची नेमकी भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी सुद्धा खोचक ट्विट केले आहे, “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ..आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..जय महाराष्ट्र !” असे ट्विट यावेळी संजय राऊत यांनी केलं आहे.