शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे परिसरातील कोल्हापुरी पद्धतीचेंधारे पूर्णपणे रिकामे झाले आहेत. बंधाऱ्यावरून दोन्ही गावे तसेच या गावातील असणाऱ्या वाड्या- वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी योजना आहेत. परंतु बंधारे कोरडे झाल्याने या भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करीत असल्याचे शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे यांनी सांगितले.
तातडीने वेळ नदीत पाणी सोडून नागरिकांची तहान भागवावी, यासाठी शिरूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने पाटंधारे विभाग, चासकमान प्रकल्प कार्यालय शिक्रापूर शाखेचे अभियंता यांच्याकडे मागणी केली आहे.याबाबत पत्र देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटना शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र ढमढेरे, तळेगाव ढमढेरे शाखाध्यक्ष प्रकाश जगताप, सुनील ढमढेरे, मंगेश चौधरी, काळूराम दोरगे, सतीश ढमढेरे, दिलीप खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुखई, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे परिसरातील शेती वेळ नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. वेळ नदीला जर वेळेवर पाणी नाही आले तर शेतीचा पाणीप्रश्न बिकट होणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावणार आहे. तसेच या भागात लोकवस्ती, वसाहती मोठ्या प्रमाणात असल्याने घरगुती वापराच्या पाण्याबरोबर पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
“चासकमान प्रकल्पातून पाणी सोडण्याचे काम सुरू असून पुढील दहा दिवसांत वेळ नदीला पाणी सोडले जाईल”, असे अभिमन्यू मासाळ (उपअभियंता,चासकमान प्रकल्प शिरूर) म्हणाले.