मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी काही केल्या संपत नाहीत. कारण आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्तार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे भूखंड सत्तार यांनी गिळंकृत केल्याच्या गंभीर आरोप राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटासोबत युती असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका होत आहे. तर याच टीकेला आता संजय राऊत यांनी उत्तर दिले आहेत.
दे.भ. देवेंद्र जी
हे खरे आहे?औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू..आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला..
भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुध्दा लूट सुरु आहे..
काय करताय बोला@BJP4Maharashtra@AmitShah @Dev_Fadnavis @PMOIndia pic.twitter.com/8EU8bUi2Ki— Sanjay Raut (@rautsanjay61) June 18, 2023
याबाबत राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “दे.भ. देवेंद्र जी हे खरे आहे? औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू… आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुध्दा लूट सुरु आहे.” सोबतच अब्दुल सत्तारांची या प्रकरणी सामनामध्ये छापून आलेल्या बातमीचे कात्रण आणि एक पत्र देखील राऊतांनी ट्वीट केले आहेत.