Sanjay Raut : देशात आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वपक्ष कामाला लागले आहेत. राजकीय नेते एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. भाजपवर लक्ष्य करताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठा दावा केला असून लवकरच भाजप (Bjp) फुटणार असल्याचे म्हटले आहे.
आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर (Bjp) हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना, “भाजपाच्या नेतृत्वाखाली सध्याची एनडीए (NDA) ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाली त्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. मग त्यांनी लोक गोळा केले व दिल्लीत एनडीए (NDA) म्हणून बैठक घेतली. कोण आहेत एनडीएमध्ये? शिवसेना, अकाली दल नसेल तर ती एनडीए शून्य आहे. एनडीए (NDA) ची ताकदच शिवसेना व अकाली दल होती. बाकीचे लोक येतात आणि जातात. २०२४ च्या आधी भाजपाही फुटलेला असेल”, असा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी केला.
“सनातन धर्माचं कुणीही समूळ उच्चाटन करू शकत नाही. एआयएडीएमके भाजपासोबत (Bjp) होती. पण त्यांचीही भूमिका सनातन धर्मविरोधी आहे. सनातन धर्म जगभरात कायम राहील. मोदींना सनातन धर्माची चिंता करण्याची काहीही गरज नाही. भाजपानं (Bjp) सनातन धर्माच्या निर्माण व संरक्षणाचा ठेका घेतलेला नाही. इथे शिवसेना बसली आहे. त्यासाठी मोदींची गरज नाही”, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी, “हा निवडणुकीचा मुद्दा नाही. आत्तापर्यंत तुम्हाला सनातन धर्माची चिंता नव्हती. आता अचानक चिंता वाटायला लागली आहे. २०२४ साठी भाजपा व मोदींकडे काहीही मुद्दा नाही. बेरोजगारी, महागाई, चीनची घुसघोरी, जम्मू-काश्मीर, कॅनडाचे आरोप हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण भाजपा (Bjp) सनातन धर्मावरच बोलत आहे”, असेही संजय राऊतांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी (Sanjay Raut) आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला. त्यांनी यावेळी, “कुणीतरी काल म्हणालं की आम्ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणतोय. दबाव काय असतो? हा सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. आमचा नाही.”, असे राऊत म्हणाले.