Sanjay Raut on BJP । राज्यात एकूणच लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहताना दिसतंय. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय. त्यांनी “भाजपची भूमिका हुकूमशाहीची, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप नष्ट होईल, असे म्हटलंय.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना,”भाजपची ताकद परावलंबी असून छोट्या पक्षांना संपवण्यावर त्यांचं लक्ष आहे. लोकशाही टिकावी यासाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन समाज पक्ष एकत्र येणार असून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर लक्ष लागलंय”असे राऊतांनी म्हटलं आहे.
निवडणुकांसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतंय Sanjay Raut on BJP।
संजय राऊतांनी, ”फक्त एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्ष संपवून टाका, ही राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भाषा होती. पण, त्याचं नड्डांना आता लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. अनेक लहान-लहान पक्ष बरोबर घेऊ त्यांना परत एनडीए उभारणी करावी लागत आहे.”
तसेच “देशातून लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, ही मोदी-शाहांची विचारसरणी आहे. या विचारसरणी विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. वंचितला सन्मानाने आम्हीसोबत घेतलं आहे. संविधान वाचवण्याच्या लढण्यात ते आमची साथ देतील.”
303 खासदारांपैकी फक्त 103 खासदार मूळ भाजपचे Sanjay Raut on BJP।
संजय राऊतांनी यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. ‘इतर पक्ष संपवणे शक्य नाही, कारण देशात लोकशाही आहे. बावनकुळे सांगतात लहान पक्ष संपवा, पण 2024 मध्ये तुमचा पक्ष राहतोय का बघा. 2024 नंतर भाजप राहणार नाही, तर काँग्रेसमय झालेला पक्ष आहे. आम्ही ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपेल. 303 खासदारांपैकी फक्त 103 खासदार मूळ भाजपचे आहेत, बाकी काँग्रेस आणि इतर पक्षांचे आहेत. या सर्व खासदारांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर हा देशच भाजप मुक्त होईल.’
तसेच आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीच भाजप संपून जाईल. सगळ्या आमदार खासदारांनी जर ठरवलं तर एका रात्रीच संपून जाईल भाजप’, असं राऊतांनी म्हटलं आहे.