मुंबई – ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला होता. मात्र, 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर अखेर संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता करण्यात आली.
दरम्यान, आत हाच धागा पकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांची आता बाहेर राहण्याची पात्रता नाही, इतकी हेराफेरी केली आहे की… त्यामुळे संजय राऊत आता लवकरच जेलमध्येच…’ असे म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “काय झाली आहे शिवसेनेची अवस्था. या शिवसेनेला गावा-गावात पोहोचवणारे आम्ही आहोत. आता तसे शिवसैनिक राहिले नाहीत. आता शिवसेनेचे 40 आमदार दिवसा-ढवळ्या निघून जातात आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणारे शिवसैनिक आहेत”. असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर देखील टीकास्त्र सोडले आहे.