मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. राऊत हे सतत मीडियासमोर असतात. त्यामुळे पक्ष कोण चालवतेय हे सर्वांना दिसतेय.
त्यामुळेच बहुतेक त्यांना अंतर्गत धोका निर्माण झाला असावा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांनी वांद्रे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या सुरक्षेवरून प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शेलार यांनी हा टोला लगावला. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे.
ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात. त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, अशी टिप्पणी त्यांनी केली.