मुंबई: शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि आमदार रामदास कदम राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. एकीकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु आहे. तर दुसरीकडे शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे.
दरम्यान, संजय राऊत राज्यपालांची भेट का घेणार आहेत ? यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला असून हि सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.