मुंबई – समीर वानखेडे यांच्यावर सक्तवसुली संचनयालाने (ईडी) काही दिवसांपू्र्वी कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आता समीर वानखेडे यांनी पुढचे पाऊल टाकत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास दिल्लीला वर्ग केल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. हा तपास दिल्लीला वर्ग करणे चुकीचे आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. शिवाय, लाच घेतल्याचे आरोपही समीर वानखेडे अडकले होते.
या प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाकडून समीर वानखेंना दिलासा मिळणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.