मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांचे एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं त्यांनी म्हटलं. यानंतर आता यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे.
अशातच काँग्रेस नेते तसेच विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की,’छगन भुजबळ म्हणाले ते खरं आहे, आणि हीच वस्तूस्थिती आहे. भुजबळ तिथे राहून वस्तूस्थिती बोलत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही छगन भुजबळांकडे बहुजनांचे नेते म्हणून बघत होतो. ते या वाक्यावर ठाम राहिले, डगमगले नाही, वक्तव्य मागे घेतलं नाही, शब्द फिरवला नाही तर ते खरे भुजबळ.” असेही भुजबळ म्हणाले आहे.
तत्पूर्वी, भुजबळ म्हणाले होते, “काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.’ असेही ते म्हणाले होते.