Varsha Gaikwad| मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे घाटकोपर परिसरातील लोखंडी होर्डिंग थेट पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 88 जण यात जखमी झाले असून 74 जणांना वाचण्यात यश मिळाले आहे. या घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. याप्रकरणावर आता काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
“मुंबईसह उपनगरांत आलेल्या सोसाट्याच्या वादळामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळून त्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक करीत आहेत. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र या दुर्घटनेत काहींना दुर्दैवानं आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
वर्षा गायकवाड यांची फेसबुक पोस्ट Varsha Gaikwad|
“मुद्दा असा की, बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं त्याठिकाणी उभारण्यात आला होता. आणि मुंबईत असे किती जाहिरात होर्डिंग्ज उभे आहेत. त्याचा आधी आढावा घेणं गरजेचं आहे. संबंधित दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्यामागे दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
“दुसरीकडे रेल्वेसेवांवर देखील वादळाचा विपरीत परिणाम झाला आहे. लोकल सेवा खोळंबल्याचं चित्र आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक भागांत पाणीपुरवठा सुद्धा खंडित झाल्याची माहिती मिळतेय. हवेच्या एका झोक्यानं ही अवस्था केली,” असे वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे.
या घटनेवरून वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “एकूणच विस्कटलेली मुंबईची घडी पुन्हा बसवण्यात या सुस्तावलेल्या सरकारला भारी पडताना दिसत आहे. विकास मॉडेलच्या बाता ठोकणाऱ्या या सरकारला आहे ती मुंबई सांभाळता येत नाही, यांचा विकास नुसता कागदावर आणि जिभेवर.. कृती यांच्यानं होणं नाही…, बाकी मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी. सुखरूप घरी पोहोचावं, ” असेही शेवटी त्यांनी म्हंटले आहे. Varsha Gaikwad|
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार
दरम्यान, सोमवारी दुपारपासून मुंबईतील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. शहरातील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डींग कोसळल्याने तब्बल 70 ते 80 गाड्या या बॅनरखाली अडकल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती दिली आहे.
हेही वाचा:
“नशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचा, जनतेच्या पैशांची सरळलूट”; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींना पत्र