मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेतील दोन्ही गटाच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वादामुळे निवडणुक आयोगाने अंधेरी निवडणुकीसाठी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह बहाल केले आहे. मात्र या चिन्हाबाबतच्या अडचणी वाढत आहेत.
समता पार्टीने उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हाला विरोध केला आहे. मशाल चिन्हं हे समता पार्टीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी ते दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर आमचा आक्षेप आहे. यासाठी आम्ही दिल्ली हायकोर्टात जाणार आहोत. कारण मशाल चिन्ह हे अजूनही समता पार्टीची ओळख आहे. हे चिन्ह समता पार्टीसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचेही मंडल यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, समता पार्टीने मशाल चिन्हाबाबत बुधवारी (दि.12) केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही काही कागदपत्र दाखल केली आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटातील ‘या’ आमदाराची सुरक्षा वाढवली, शिंदे गटात प्रवेश करणार? https://t.co/L9vwVBOnIP
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022