पाटणा : आजकालच्या युगात प्रामाणिकपणा हा खूप दुर्मिळपणे आढळून येत आहे. काही बातम्यांमधून रिक्षाचालक किंवा एखादा व्यक्ती सापडलेली वस्तू परत करत असल्याचे आपण ऐकले आणि वाचले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला एक दोन व्यक्तीच्या नव्हे तर चक्क २६ गावांचा प्रामाणिकपणा सांगणार आहोत.
आजच्या युगात, जिथे लोक फक्त घेण्याची स्पर्धा करतात, तिथे काही लोक कोणतीही वस्तू फुकट घेण्याचा विचार देखील करत नाही. त्यांना जामीन, मदत किंवा कोणत्याही प्रकारची मदत आवडत नाही. हे लोक मदत करतात जेव्हा ते मजुरी करतात किंवा त्या बदल्यात काहीतरी करतात. आम्ही पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रामनगर ब्लॉकच्या तब्बल 26 गावांबद्दल बोलत आहोत.
२६ गावांच्या दोन पंचायतींमधील लोक अतिशय प्रामाणिक आणि मेहनती आहेत. त्यांना कोणाकडूनही काहीही फुकट घ्यायला आवडत नाही. या वर्षीच्या जून-जुलैमध्ये या गावांमध्ये पूरपरिस्थिती उदभवली होती. या पुरामुळे त्रस्त झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी गुंज नावाची सेवाभावी संस्था पुढे सरसावली. दरम्यान या संस्थेने मदत वाटप सुरू केले तेव्हा या गावातील लोकांनी त्यांची कोणतीही मदत फुकटपणे करणे अमान्य केले. त्यावेळी त्यांचा प्रामाणिकपणा जगासमोर उघड झाले. गावात पुराचे पाणी वाढत होते शेवटी गावांना वाचवण्यासाठी धरण बांधून नदीचा प्रवाह वळवण्यात आला आणि या कामात ज्यांनी मदत केले त्याच लोकांमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
या गावासाठी डिग्निटी फॉर वर्क अंतर्गत काम करणाऱ्या गुंज संस्थेचे सदस्य अजय कुमार म्हणाले की, जून-जुलैमध्ये दोन्ही गावात चार-पाच पूर आले होते. अनेक कुटुंबांना यामुळे त्रास सहन करावा लागला. मदत साहित्याच्या वितरणादरम्यान लोकांनी ते मोफत घेण्यास नकार दिला. गाव वाचवण्यासाठी धरण बांधून नदीचा प्रवाह वळवण्यासाठी चार-पाच दिवस काम करणाऱ्यांना मदत किट देण्यात आली.
या गावांच्या प्रामाणिकतेविषयी आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत. जर गावात कोणाला कोणाची वस्तू सापडली तर ती वस्तू सरळ गावच्या प्रमुखाकडे देण्यात येते. तसेच देणग्या न घेणे, कोणाच्याही पडलेल्या किंवा सापडलेल्या वस्तू न घेणे, कठोर परिश्रम करणे आणि जे मिळते त्यावर समाधानी राहण्याची परंपरा येथील लोकांना वारसाने मिळाली आहे.
थारू वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडियाच्या दोन तपचे अध्यक्ष रामधारी महतो, नौरंगीया पंचायतीचे सचिव महेंद्र महतो, गौरीशंकर महतो यांनी या गावाच्या लोकांविषयी माहिती दिली. या 26 गावांमध्ये चालणारी ही परंपरा वडिलोपार्जित आहे. आमच्या पूर्वजांनी देखील कधीही फुकट खाल्ले नाही, त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना मिळालेल्या मोबदल्यावर ते नेहमी समाधानी होते. वाटेत कोठेही काही मौल्यवान किंवा कोणतीही वस्तू आढळली तर ती गावाच्या प्रमुखाकडे जमा केली जाते.
दरम्यान, आजच्या कलीयुगात अशीदेखील माणसे पाहायला मिळतील असे कोणाला वाटणार देखील नाही. पण हा गैरसमज या २६ गावातील लोकांनी दूर करून दाखवला आहे. दरम्यान, त्यांच्या या प्रामाणिकपणाला सध्या सर्व स्तरातून कौतूक होत असून त्यांच्या या कार्याला सलाम म्हणत नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.