लॉकडाऊन जाहीर झाला तेंव्हा सलमान खान पनवेलच्या आपल्या फार्महाऊसवर गेलेला होता. पनवेलचे हे फार्महाऊस त्याचे अगदी आवडते ठिकाण आहे. सुट्टी एन्जॉय करायला तो नेहमीच या फार्महाऊसवर जात असतो. तिथे रहाणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यासारखे वाटते, असे त्याचे मत आहे.
लॉकडाऊनमुळे त्याला तिकडेच अडकून रहावे लागले. त्याच्या बरोबर त्याची बहिण अर्पिता, अर्पिताची दोन मुले, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह आणखीही काही मित्र मंडळी होती. तिथे सलमानने अर्पिताच्या मुलांसमवेत खूप दंगामस्ती केली. इथल्या निसर्गरम्य वातावरणात 1-2 गाण्यांचे शूटिंगदेखील उरकून घेतले.
सलमानची ही गाणी नंतर सोशल मिडीयावर व्हायरलही झाली आहेत. बाकीचे लोक घरी परत आले, पण सलमान फार्महाऊसवरच राहिला होता. लॉकडाऊन थोडा शिथिल झाल्यावर सलमानही आता आपल्या घरी परत आला आहे. बांद्रयातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये नुकताच तो परत आला. आता सलमान आपल्या “राधे’चे प्लॅनिंग करणार आहे. या सिनेमाचे काही दिवसांचे शूटिंग अजून बाकी आहे. त्यामुळे येत्या ईदच्या मुहुर्तावर “राधे’रिलीज होणे अवघड आहे. त्या संदर्भात डायरेक्टर प्रभुदेवाबरोबर सलमानची सविस्तर चर्चा होणार आहे.