मुंबई : अस्पृश्यता निवारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान मोठं असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शरद पोंक्षे यांचा चांगलाच समाचार घेतला.
सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये लिहले आहेर कि, अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असे म्हणणे म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात हॉलिवूडच्या बेन किंग्जले, अल पचिनो आणि बॉलिवूडच्या दिलीप कुमार, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा शरद पोंक्षे यांचे योगदान मोठं आहे असे म्हणणे होय!
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमान सहन करावा लागला. मात्र सावरकर ब्राम्हण जातीत जन्माला येऊनसुद्धा त्यांनी ब्राम्हणांविरुद्ध आवाज उठविला.दोन्हीही महापुरुषांपेक्षा सावरकरांचे योदान मोठेच आहे, असे शरद पोंक्षे म्हणाले होते.