बीसीसीआयच्या निवड समितीने गेल्या आठवड्यात बुधवारी विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवले आणि रोहित शर्माला नवा कर्णधार बनवले. एकदिवसीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने प्रथमच विराट कोहलीच्या वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कर्णधारपदाबद्दल विधान केले आहे.
कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या योगदानाबद्दल रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. रोहित म्हणाला की, विराटने पुढे येऊन संघाचे नेतृत्व केले त्याचा प्रत्येक सामना जिंकण्याचा त्यांचा निर्धार होता.विराट कोहलीने 95 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करत 65 सामने जिंकले.
बीसीसीआय टीव्हीशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, त्याने संघाला अशा स्थितीत आणले आहे जिथून मागे वळून पाहता येणार नाही. त्याने पुढे येऊन नेतृत्व केले आणि प्रत्येक सामना जिंकण्याचा निर्धार केला. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना आम्ही खूप छान वेळ घालवला, मी विराटच्या नेतृत्वाखाली उत्तम क्रिकेट खेळलो आहे आणि आता मी तेच करत राहीन, आपल्याला संघ म्हणून आणि व्यक्ती म्हणून चांगले होत राहण्याची गरज आहे.