नवी दिल्ली – चंदीगड गर्ल ‘हरनाझ संधू’ने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आहे. तब्बल 21 वर्षानंतर भारताला मिस यूनिवर्सचा खिताब मिळाला आहे.
तिच्या आधी 21 वर्षांपूर्वी लारा दत्ताने 2000 साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. 21 वर्षीय हरनाझ संधूने नुकताच ‘मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021’ खिताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाझने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. आणि आज हा सुद्धा खिताब हरनाझने आपल्या नवी केला आहे.
दरम्यान, ‘टॉप 3’मध्ये आपले स्थान निर्माण करणाऱ्या हरनाजला विचारण्यात आले होते की, “ताणावाचा सामना करणाऱ्या तरुणींना ती काय सल्ला देईल? या प्रश्नाचे उत्तर देत हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला आहे. हरनाजने या प्रश्नाचे उत्तर इतक्या चांगल्या पद्धतीने दिले की, या उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रश्नाच्या उत्तरात हरनाज म्हणाली की.., “आजच्या तरुणाईवर सर्वात मोठं दडपण म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. ही गोष्ट तुम्हाला अधिक चांगले होण्यास मदत करते. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
तसेच स्वतःसाठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.’