नवी दिल्ली :- भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने हार्दिक पंड्यापेक्षा टी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे राहिलेले चांगले, असे म्हटले आहे. तसेच केवळ रोहितलाच नव्हे तर टी-20 संघात विराट कोहलीही असणे अत्यंत गरजेचे आहे, तरच तुम्ही पुढील वर्षी टी-20 विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न पाहू शकता, असे स्पष्ट मत गंभीरने व्यक्त केले आहे.
आता प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे तसेच पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व दिले गेले असले तरीही ते हंगामी असावे. कायमस्वरूपी विचार केला तर रोहित ज्या पद्धतीने नेतृत्व करत आहे ते पाहता क्रिकेटच्या तीनही प्रकारांसाठी रोहितच कर्णधार हवा.
शिवाय आपण पुढील वर्षी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळणार आहोत. त्यामुळे कोहलीलाही संघात स्थान मिळाले पाहिजे. एखाद्या टी-20 मालिकेतून विश्रांती घेणे मान्य आहे; परंतु विश्वकरंडकात कोहली पाहिजेच, असेही गंभीर म्हणाला.
#CWC2023 #INDvAUS Final : “आणखी किती दिवस दुःख…” पराभवानंतर 3 दिवसांनी कुलदीपनं व्यक्त केल्या भावना
अनुभव नवोदितांसाठी लाभदायक
संघात रोहित व कोहली असतील तरच संघातील नवोदितांना मोठा अनुभव मिळेल. तसेच कोणत्या परिस्थितीत दडपण कसे हाताळायचे याचेही धडे त्यांना मिळतील व पुढील पाच वर्षांचा विचार करता एक भक्कम व अनुभव संपन्न भारतीय संघ तयार झालेला दिसेल, असा विश्वासही गंभीरने व्यक्त केला.