नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यातील पराभवातून सावरू शकलेले नाहीत. सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाला विजेतेपदाच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही आणि अंतिम फेरीत 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे क्रिकेट चाहते तसेच संपूर्ण भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ कमालीचा निराश झाला आहे. मात्र, विश्वचषक संघाचा भाग असलेल्या खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत. या क्रमवारीत कुलदीप यादवने सामना संपल्यानंतर तीन दिवसांनी इंस्टाग्राम अन् ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कुलदीपनं म्हटले आहे की, एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, याचे आणखी किती दिवस दुःख बाळगायचे. जे घडले तो भूतकाळ झाला आहे आता नव्या उमेदीने नव्या स्पर्धांमध्ये पुन्हा विजयाचा मार्ग शोधायचा आहे, असे भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने म्हटले आहे.
Our journey from Chennai to Ahmedabad ended in a disappointing result, but we take pride in our achievements over the six weeks. Despite the pain, we’re determined to work harder for the next opportunity.
Thanks to our dedicated support staff, we were fully prepared for every… pic.twitter.com/kz3ZdH0B3j
— Kuldeep yadav (@imkuldeep18) November 22, 2023
आगामी काळात भारतीय संघाला सातत्याने विविध मालिका खेळायच्या आहेत. जे झाले ते विसरून पुढे गेले पाहिजे तरच अपयशावर मात करणे शक्य होणार आहे. विश्वकरंडक मिळवता आला नाही हे आमच्यासाठी खूपच वाईट होते. कारण, आम्ही त्यापूर्वीच्या सगळ्या सामन्यात विजयी ठरलो होतो. केवळ अंतिम सामन्याने या सर्व यशावर पाणी फेरले गेले, असेही कुलदीप म्हणाला.
दरम्यान, अंतिम फेरीत भारताच्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅव्हिस हेडच्या (137) शतकी खेळीच्या जोरावर 43 षटकांत 4 बाद 241 धावा करत सहज सामना जिंकत विश्वविजेतेपद पटकावलं. भारताच्या फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी विभागासाठी हा स्पर्धेतील सर्वात वाईट दिवस ठरला, ज्याने प्रेक्षकांच्या उत्साहाचे दुःखात रूपांतर केले, जसप्रीत बुमराहने अंतिम फेरीत दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, तर फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव प्रभाव पाडू शकले नाहीत आणि त्यांना एकही बळी घेता आला नाही.
पराभव झाला असला तरी, भारतासाठी अनेक सकारात्मक गोष्टी होत्या कारण कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा होता आणि त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले होते. 11 सामन्यांमध्ये माजी भारतीय कर्णधाराने तीन शतके आणि सात अर्धशतकांसह 765 धावा केल्या. वेगवान गोलंदाज शमीने सर्वाधिक विकेट 24 बळी घेतले.