मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एसटी कर्मचारी सूर्यवंशी यांची आत्महत्या ही दुर्देवी घटना असल्याचे ट्विट करत शिंदे -फडणवीस सरकारकडे एक कळकळीची विनंती केली आहे.
हे ही वाचा… Sangli : वेळेत पगार न झाल्याने ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य; मन सुन्न करणारी घटना
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “वेळेत पगार न झाल्याने आर्थिक विवंचनेतून सांगली जिल्ह्यातील #ST कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. गरज पडली तर आमदारांचे पगार थांबवा, पण एसटी #ST कर्मचाऱ्यांचे पगार द्या. असं वाऱ्यावर सोडू नका, ही कळकळीची विनंती!
तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनी सूर्यवंशी यांची आत्महत्या ही दुर्देवी घटना असल्याचे ट्विट करत या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. तसेच शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.
हे ही वाचा…. “कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत…” ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळे संतप्त
खासदार सुळे यांनी म्हटले आहे की, “एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत बसलेल्या ED सरकार या कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार करण्यात देखील अपयशी ठरले आहे. या गरीब, कष्टाळू आणि संवेदनशील कर्मचाऱ्यांच्या भावनांचा या सरकारने अक्षरशः खेळ मांडला, हे अतिशय संतापजनक आहे. ED सरकार कृपया आपण एस.टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.