मुंबई – देशात सध्या भारत आणि इंडिया नावावर नवा वाद निर्माण आहे. केंद्र सरकारकडून इंडिया नावात बदल करण्यात येत असून त्याऐवजी भारत हे नाव देण्याचा मोदी सरकारचा मानस असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यातच मोदी सरकारने बोलवलेल्या पाच दिवसीय संसदेच्या विशेष अधिवेशनात संविधानातील ‘इंडिया’ हे नाव हटवणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी एक्स (ट्वीटर) वर लिहिले की, “नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं. देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे.त्यामुळे महागाई ,बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं.”
नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं.
देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 7, 2023
मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी ही विनंती देखील यावेळी रोहित पवार यांनी केली. यापूर्वी शरद पवार यांनी देखील याप्रकरणी मोदी सरकारवर टीका केली होती.