Rohit Pawar – ज्यांनी भाजपला सत्तेचा मार्ग दाखवला तेच शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकताये. पण लोकसभा निवडणुकीत हे वर्तुळ पूर्ण होईल आणि हाच बळीराजा सत्तांध झालेल्या मदमस्त ‘राजा’ला डोळे पुसत घरचा रस्ता दाखवेल अशा कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.
आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काही फोटो शेअर करत ही टीका केली आहे. गेली दहा वर्षे खोट्या आश्वासनांची पेरणी करून सत्तेचे पीक घेतलेल्या केंद्र सरकारच्या कोणत्याही खोट्या आश्वासनाला आता शेतकरी बळी पडणार नाही.
२०२४ मध्येही हेच सरकार सत्तेत आले तर सरकार आणि सामान्य माणसामध्ये उभे केलेले हेच अडथळे इतके मोठे होतील, की ते ओलांडणंही कठीण होईल. त्यामुळे सरकारने आता कोणतीही दिशाभूल न करता अन्नदात्याच्या रास्त मागण्या मान्य करून न्याय द्यावा, ही विनंती!, असेही पवार पुढे म्हणाले आहेत.