Rohit Pawar : शिवसेना पक्षापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंधर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया देत त्यांनी थेट अजित पवार गटाला इशारा दिला आहे.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी कालच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. त्यांनी संविधानाच्या बाजूने निकाल लागण्याची अपेक्षा होती अअसे म्हटले पण आता काय बोलणार पण आता निवडणूक अयोग्य हा भाजपचे वेगळे डिपार्टमेंट झाल्यासारखे वाटत आहे. असे म्हणत भाजपवर टीका केली. तसेच निर्णय आमच्या बाजूने लागणार नाही याचा विश्वास आम्हाला होता तसेच झाले” असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी “शरद पवार यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच त्यांचा विश्वासघात केला आहे. एखाद्याच्या घरात जाऊन त्याच्या घरावर कब्जा करण्यासारखे कृत्य काही लोकांनी केले आहे. त्यामुळं जर आमच्यावर दबाव तंत्राचा वापर करून आमचं सर्वस्व घेणार असाल तर आम्हाला कोर्टात जाऊन न्याय मागावा लागणार” असे म्हणत त्यांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे.
दरम्यान, काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत,” केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते….आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!” असे म्हटले होते.