समविषम तारखांच्या पाट्या शोभेसाठीच का? : कोणीच नियमांचे पालन करीत नाही
स्वयंशिस्त महत्वाची
वरील सर्व रस्त्यांवर स्थानिक लोकांच्याच गाष्या मोठ्या प्रमाणावर लागलेल्या असतात.त्यामुळ्र बाहेरून तेथे येवून गाष्या लावणाऱ्यांना जागा मिळत नसल्याने या गाड्यांच्या पुढच्या बाजुलाच तेही गाड्या लावत असल्याने वाहनांच्या पार्किंगची शिस्त मोडते त्यातूनच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना रस्ता न मिळाल्याने वाह्तुकीचा खोळंबा होतो. त्या ऐवजी सर्वांनी एकाच रांगेत गाड्या लावल्यास वाहतुकीचा खोळंबा कमी होईल.
नगर – वाहतुकीची कोंडी ही काही नगरला नवीन बाब नाही. अगदी मुख्य रस्त्यांपासून ते छोट्या रस्त्यांपर्यंत सगळी कडेच वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच अनुभव आहे.मात्र आता त्यात भरपडली आहे ती रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या दुचाकी वाहनांची या वाहणांउळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचा प्रत्यय कित्येकदा येतो.
नगरमधील काही रस्त्यांवर पी-1 ,पी-2च्या पाट्या लावलेल्या आहेत मात्र त्या शोभेसाठी लावल्यात कि काय असा प्रश्न पडतो. विशेषतःनेता सुभाष चौक,चितळे रस्ता, नवीपेठ ,कापड बाजार या रस्त्यांवर दुतर्फा गाड्या लावलेल्या असल्याने वाहतुकिची कोंडी होते. येथे लावलेल्या पी-1 पी2 च्या पाट्यांना फारसं कोणी जुमानत नाही. बर या रस्त्यात वाहतुक पोलीस फिरकण्याची तसदीही घेत नाहीत.
सम विषम तारखांसाठी लावलेल्या या पाट्यांप्रमाणे कोणीही पार्किंगही करत नाही. कापड बाजारसारख्या ठिकाणी दुकानदारांच्या गाड्या दुकाना समोर लावून दुकानात येण्यासाठी लोखंडी फडताळ टाकण्यात येते त्यामुळेही जागा अडते. ही फडताळ आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली, मात्र ही कारवाई फार्स ठरण्याचीच मोठी शक्यता आहे. नेता सुभाषचौक आणि नवी पेठेतही याहून वेगऴी परीस्थिती नसते. तेथेही समविषम तारखेचा कोणताही विधी निषेध पाळला जात नाही.
शिवाय याभागात ग्राहक म्हणून येणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्याने येथील परीस्थिती वेग़ळी नसते. या रस्त्यात उभ्या केलेल्या गाड्यांमुळे येथून वाहतुक करणे मोठे जिकिरीचे होवून बसते.समोरासमोर वाहने आली की वाहतुक खोळंबा झालाचं म्हणून समजावं अशी परिस्थिती या रस्त्यात असते. अर्थात चितळेरस्ता जुन्या लोर्टगल्ली जवळील रस्त्यांचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते.या रस्त्यावरही दुतर्फा गाड्या उभ्या असतात.