संभाजी ब्रिगेड ः अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
नगर – जगण्याची उमेद हरवलेल्या शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राज्यसरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करावी. दुष्काळात शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा, पाणीची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांच्या मगागतीसाठी एकरी दहा हजार रुपयांचे अनुदान द्यावे. अत्यंत भयानक अशा पद्धतीचे दुष्काळ असल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे, सततत्या नापिकीमुळे, दुष्काळाच्या भयानक दाहकतेमुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासिनते मुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा संभाजी ब्रिगडेने दिला आहे.
यासंदर्भात संभाजी ब्रिगडे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व माजी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमत्र्यांना निवेदन पाठवून आर.डी.सी.प्रशांत पाटील यांना हि निवेदन देण्यात आले. यावेळी, कार्याध्यक्ष राहुल आल्हाट, श्रीगोंदा संघटक संदीप कुनगर, शुभम गायकवाड, प्रशांत काळोखे, मंगेश भोसले, अधिनाथ मोतेकर, देविदास माने, रामदास बर्डे, वाहिद शेख उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात , राज्यामध्ये अत्यंत भयानक दुष्काळ असल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे,सततत्या नापिकीमुळे,दुष्काळाच्या भयानक दाहकतेमुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासिनते मुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आजच्या या भिषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून सर्वच शेतकरी हे आत्मविश्वास गमावलेल्या अवस्थेत जगात आहेत.
शेतकऱ्यांसह त्यांच्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेना, जनावरांना चारा उपलब्ध नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या समजून घेणे गरजेचे असून, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यास्तव काही प्रमुख मागण्यांची तात्काळ पूर्तता करून तातडीने दिलासा द्यावा असे म्हटले आहे. वरील सर्व उपाय-योजना व दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भातील मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी नगर जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेत तत्काळ योग्य तो निर्णय घ्यावा.