RJD-JDU meeting : देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे आता जोरात वाहताना दिसून येत आहे. त्यासाठी सर्व पक्षाने जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लवकरच एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आता बिहारमधील इतर पक्षांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसत आहे. कारण यामुळे आता राजद आणि जदयूच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याने बिहारमध्ये राजकीय तापमान वाढले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात दोन महत्वाच्या बैठक घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यातील पहिली बैठक नितीश कुमार यांच्या निवासस्थानी, तर दुसरी बैठक बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांच्या घरी झाली. बैठकीनंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
भाजपवर अफवा पसरवण्याचा आरोप RJD-JDU meeting
तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी संवाद साधताना, भाजपवर अफवा पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जेव्हापासून लालू (यादव) आणि नितीश (कुमार) यांनी हातमिळवणी केली, तेव्हापासून भाजप अडचणीत आला आहे. त्या निराशेमुळेचा भाजपकडून अशी वक्तव्य करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
अमित शहांच्या टिप्पणीवर मौन RJD-JDU meeting
अमित शहा यांच्या नितीशकुमार यांच्यावरील टिप्पणीबद्दल विचारले असता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी, “याविषयी मला माहित नाही… कदाचित अमित शाह यांना काय म्हणायचे आहे याविषयी तुमच्याकडे चांगली माहिती असेल.” असे म्हणत प्रकरणावर मौन बाळगले.
इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल RJD-JDU meeting
तेजस्वी यादव यांनी यावेळी, “बिहारच्या राजकीय क्षेत्रातून भाजपचा चेहरा मोहरा पूर्णपणे पुसून टाकले जाईल. असा दावा यावेळी केला. तसेच “आम्ही मिळून राज्य सरकार चालवत आहोत. राज्याचा जलद विकास सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला नियमितपणे भेटणे आवश्यक आहे. ” बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनीही नितीशकुमार महाआघाडीवर नाराज असल्याची अटकळ योग्य नसल्याचे सांगितले. तसेच ‘इंडिया’ आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे म्हटले.
नितीश कुमारांबद्दल काय म्हणाले अमित शहा? RJD-JDU meeting
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांच्यासारख्या माजी मित्रपक्षांचे एनडीएमध्ये पुन्हा स्वागत केले जाईल का? असे विचारले असता त्यावर ते म्हणाले होते की, “याबाबत कोणाकडे काही प्रस्ताव असल्यास त्यावर विचार केला जाईल,” असे म्हटले होते.