पुणे – मार्केट यार्डातील फळ बाजारात आवक घटल्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई, लिंबाच्या भावात वाढ झाली. तर, पेरू आणि संत्राच्या भावात मात्र घट झाली.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थीर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने कलिंगडच्या भावात किलोमागे दोन रुपये, खरबूज आणि पपईच्या भावात किलोमागे पाच रुपये आणि लिंबाच्या गोणीमागे तीस रुपयांनी वाढ झाली. तर, संत्रा आणि पेरुच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 1 ट्रक, मोसंबी 40 टन, संत्री 5 ते 6 टन, डाळिंब 150 ते 175 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, सीताफळ 8 ते 10 टन, खरबुजाचे 4 ते 5 टेम्पो इतकी आवक झाली.
फळांचे भाव : लिंबे (प्रतिगोणी) : 100-150, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-220, (4 डझन) : 30-100, संत्रा : (3 डझन) : 100-200, (4 डझन) : 20-80, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 30-120, गणेश : 5-25, आरक्ता 10-40 कलिंगड : 5-12, खरबूज : 10-30, पपई : 5-20, चिकू : 200-700, पेरू : 250-400, सीताफळ : 10-150.