मुंबई – संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्यांच्या मते ती या निवडणुकीस उभी रहाण्यास पात्र आहे, आणि म्हणूनच सगळ्यांच्या इच्छेचा मान राखून या निवडणूकेमध्ये अंतरा उभी रहाण्यास तयार देखील झाली आहे. पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत अडकली आहे कारण तिला एका गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की, मल्हारचा याला पूर्णत: विरोधात आहे.
परंतू आजवर रिक्षा कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी झटत आलेल्या अंतरासमोर आता हा एकमेव पर्याय आहे, ज्याद्वारे ती कामगारांच्या हक्कासाठी लढू शकेल. सध्या जीव माझा गुंतला मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचली असून रिक्षाचालकांच्या मदतीसाठी अंतरा मैदानात उतरणार आहे.
“जीव माझा गुंतला मालिकेमध्ये आपली लाडकी अंतरा रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभी राहिली असून हा अतिशय वेगळा ट्रॅक मालिकेमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. अंतरा रिक्षाचालक, आणि कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे, त्यांच्या हितासाठी तिने हा निर्णय घेतला आहे.
तिच्या या निर्णयामुळे मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. यानंतर अंतराचे आयुष्य बदलणार आहे. एखाद्या माणसाच्या व्यवसायाच्या आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर वर्गीय भेदभाव ही आपल्या समाजातील सर्वात प्रचलित गोष्ट आहे. आणि या गोष्टीचा विरोधात करण्यासाठी,
अंतराने सहकर्मचारी वर्गासाठी तिच्या लग्नाला पणाला लावून निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संघर्षामुळे आणि मल्हार आणि तिच्यामध्ये असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे दोघांचा पुढचा प्रवास कसा असेल हे बघणे प्रेक्षकांसाठी अधिकच मनोरंजक असणार आहे”.