नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्री माता वैष्णोदेवी व्यवस्थापन बोर्डाची पुनर्रचना केली आहे. या बोर्डावर विविध क्षेत्रातील आठ व्यक्तींना तीन वर्षांसाठी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या आठ सदस्यांमध्ये एका औषध कंपनीचे अध्यक्ष के के शर्मा, मुंबईचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज, निवृत्त आयपीएस अधिकारी अशोक भान, निवृत्त आयएएस अधिकारी बालेश्वर राय आणि जम्मूचे निवृत्त न्यायाधीश सुरेश कुमार शर्मा यांचा समावेश आहे.
वैष्णवदेवी मंदिरासाठी रोपवे तयार करण्याचा प्रस्ताव असून नवीन बोर्ड त्यासाठी प्रयत्न करेल असे के. के. शर्मा यांनी सांगितले. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी येथेही तिरूपती बालाजी मंदिराप्रमाणे व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे असे ते म्हणाले.