मुंबई: देशातील करोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. मागील दोन दिवसांत राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत तीन हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. परंतु असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हर म्हणजेच करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
या 27 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट आहे. ही टक्केवारी 10 जून रोजीच्या आकडेवारीवर आधारित आहे.
रायगड, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट असलेले जिल्हे
जिल्हा – करोनामुक्त रुग्ण – ऍक्टिव्ह रुग्ण – टक्केवारी
1. पुणे – 6079 – 3888 – 58.41%
2. सातारा – 361 – 293 – 53%
3. अहमदनगर – 139 – 72 – 63%
4. रायगड – 981 – 534 – 62%
5. नाशिक – 1130 – 497- 66%
6. कोल्हापूर – 470 – 193 – 70%
7. सांगली – 106 – 78 – 56%