मॅंचेस्टर – पाकिस्तानच्या यासिर शहा याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या व दुसऱ्या दोन्ही डावांत मिळून 8 गडी बाद केले. यावेळी 40 कसोटीत त्याचे 221 बळी नोंदले गेले.
त्याने या कसोटीत आणखी बळी घेतले नाहीत व भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याच्या नावावर 40 कसोटीत सर्वाधिक 223 बळींचा विक्रम कायम राहिला. या सामन्यात पहिल्या डावात 4 बळी घेणाऱ्या यासिर शहाने दुसऱ्या डावातही 4 बळी घेतले.