नगर -पाणी वाचविण्यासाठी पाणी व्यवस्थापनाची खरी गरज आहे. अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच नगरकरांना स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याचे वारंवार नमुने घेण्यात यावे, अशा सुचना पाणी पुरवठा विभागास महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केल्या.
वसंत टेकडी येथील मुख्य जलकुंभाची पाहणी नुकतीच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संजय ढोणे, सुरज शेळके, अजय चितळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी वाकळे म्हणाले की, नगर शहराला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी केंद्र सरकारन आमृत योजना कार्यन्वित करण्यात आली आहे. मुळाधरण ते वसंत टेकडी पर्यंतचे काम प्रगतीपथावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी दररोज आढावा घेतला जात आहे. 6 महिन्यामध्ये ही योजना मार्गी लागेल अशी अपेक्षा त्यांनी महापौरांनी व्यक्त केली.