नवी दिल्ली – काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काॅंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली आहे. त्यांच्या या निर्णयाने काॅंग्रसेमधील अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी म्हंटले आहे की, “प्रदीर्घ काळ कॉंग्रेससोबत होते. त्यांनी छोट्याश्या गोष्टीकरता पक्ष सोडला असून हा काही परिपक्व निर्णय नाही. राहुल गांधी यांच्यासोबत आमचा देवाण घेवाणीचा व्यवहार नाही. ते आमचे नेते आहेत आणि राहतील. पक्षासाठी काही करणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही कुठे जाऊ शकत नाही असे नाही. मात्र आम्ही पक्षासोबत राहु. आम्ही पक्षासोबत राहुन देशाचे भवितव्य पाहतो.”
कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हंटले की, “पक्षाने ज्या व्यक्तीला सगळ्यांत जास्त सन्मान दिला त्याच व्यक्तीने एका सराईतासारखा व्यक्तीगत हल्ला करत पक्षाच्या नेतृत्वाला धोका दिला. यातूनच त्यांचे खरे चरित्र लक्षात येते. जीएनए (गुलाम नबी आझाद) यांच्या डिएनएला मोदी-फाईड करण्यात आले आहे.”
कॉंगेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “पक्ष संकटात असताना, दलित, अल्पसंख्य, प्रसार माध्यमे, लोकशाहीवर हल्ले होत असताना आपल्याला एकत्रितपणे भाजप आणि आरएसएसशी लढण्याची गरज आहे. अशा वेळी लढण्याऐवजी तुम्ही पळ काढत आहात. तर तो पक्षासोबत विश्वासाघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या वातावरणाला घाबरून तुम्ही पळत आहात.”