मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद अधिकच तीव्र होत आहे. पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. हळूहळू सगळ्यांना समजेल. ते जर निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टातून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा. असे ते म्हणाले. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उडी घेत टीका केली आहे.
गर्जेल तो पडेल काय?
नील सोमैय्या यांच्या विरुद्ध संजय राऊत यांनी बोटभर तक्रारही केलेली नाही असे प्रतिज्ञापत्र EOW ने न्यायालयात सादर केले आहे.
कुठे आहेत, २५ हजार कोटींची भ्रष्टाचाराचे पुरावे? ED च्या विरोधातील साक्षीदार? उगाच पत्रकारांसमोर टीमक्या,डायलॉगबाजी आणि तोंडाच्या वाफा.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 2, 2022
भातखळकर यांनी ट्विट केले आहे की,’गर्जेल तो पडेल काय? नील सोमैय्या यांच्या विरुद्ध संजय राऊत यांनी बोटभर तक्रारही केलेली नाही असे प्रतिज्ञापत्र EOW ने न्यायालयात सादर केले आहे. कुठे आहेत, २५ हजार कोटींची भ्रष्टाचाराचे पुरावे? ED च्या विरोधातील साक्षीदार? उगाच पत्रकारांसमोर टीमक्या,डायलॉगबाजी आणि तोंडाच्या वाफा.’असा सवाल करत खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.