मुंबई – राज्यात करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. 2020 मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली करोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक अगदीच शेवटचा पर्याय म्हणजे लॉकडाउन करावा लागेल असं राज्यातील बडे नेते सांगताना दिसत आहेत.
याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी लॉकडाउनमुळे आर्थिक समस्या उद्धभवतात. त्याचं काय असं विरोधक विचारला त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले,’पंतप्रधान मोदी यांनी पाच-सहा महिने लॉकडाउन केला होता. तेव्हा सुद्धा आर्थिक नुकसान झाले होते लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान होते हे मला माहिती आहे. साऱ्यांनाच याची कल्पना आहे. जनतेची काळजी असते तेव्हा काही निर्णय घ्यावेच लागतात. त्यामुळे लॉकडाउनचे राजकारण करू नये.”
ते पुढे म्हणाले, “कोणीही लॉकडाउनच राजकारण करू नये , मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जे काही सांगत आहेत ते राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी सांगत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आणि त्यांच्या घटक पक्षांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला अलंगावला आहे.