चेन्नई : मुंबई आणि तामिळनाडू यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत अनिर्णित राहिली.या लढतीत मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळवले तर तामिळनाडूला १ गुणावर समाधान मानावं लागले. आदित्य तरे सामन्याचा मानकरी ठरला.
Mumbai take three points by virtue of their first innings lead in Chennai. pic.twitter.com/cSup6p0j1C
— TNCA (@TNCACricket) January 14, 2020
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. पहिल्या डावात मुंबईने ४८८ धावा केल्या. त्याला उत्तर देताना तामिळनाडूचा पहिला डाव ३२४ धावांत आटोपला. त्यानंतर मुंबईने तामिळनाडूला पुन्हा फलंदाजीला पाचारण केले. तामिळनाडूने अखेरच्या दिवशी उर्वरित षटके खेळून काढताना सामना वाचविला. त्यांनी दुस-या डावात १ बाद ४८ धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई : पहिला डाव : सर्वबाद ४८८ (आदित्य तरे १५४, शम्स मुलाणी ८७, साई किशोर १२५-४, आर आश्विन १२१-३, टी नटराजन १२४-२) अनिर्णित वि. तामिळनाडू : पहिला डाव : सर्वबाद ३२४( आर आश्विन ७९, साई किशोर ४२, कौशिक गांधी ६०, अभिनव मुंकूद ५८, शम्स मुलानी ४-७२, तुषार देशपांडे २-७०) आणि दुसरा डाव – २२ षटकांत १ बाद ४८.