Ranji Trophy 2024 :- मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबईने विदर्भचा 169 धावांनी पराभव केला. मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी करंडकावर नाव करोल. मुंबईने रणजी करंडक जिंकल्यानंतर त्यांच्यावर बीसीसीआयकडून त्यांना 5कोटी रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. बीसीसीआयकडून उपविजेत्या विदर्भच्या संघाला 3 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे.
गेल्या वर्षी म्हणजे बीसीसीआयने देशंतर्गत डोमेस्टिक क्रिकेटमधील सर्व स्पर्धांची बक्षीस रक्कम वाढवली होती. यापूर्वी रणजी विजेत्या संघाला 2 कोटी रूपये तर उपविजेत्यांना 1 कोटी रूपये मिळत होते. आता यात बदल करण्यात आला असून बक्षीस रक्कमेत भरघोस वाढ केली आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी विदर्भचा पहिला डाव १०५ धावात संपवला होता. पहिल्या डावात ११९ धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावांचा डोंगर उभरला. मुशीर खानने १३६, श्रेयस अय्यरने ९५ आणि अजिंक्य रहाणेने ७३ धावांचे योगदान दिले होते.
Ranji Trophy 2024 : अन्… तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईनं जिंकला करंडक
विजयासाठी ५३८ धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विदर्भने देखील घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबईला चांगलीच लढत देण्याचा प्रयत्न केला. अक्षय वाडकरच्या १०२ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि करूण नायरच्या ७४ धावांच्या योगदानामुळे विदर्भने ३६८ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, ते पराभव टाळू शकले नाहीत.