नगर – रामनाथ वाघ यांचे संपूर्ण आयुष्य हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी भारलेले होते. ते कृतिशील जीवन जगले .आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले म्हणून त्यांच्या स्मृती अनंत काळ चिरंतर राहतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त रामनाथ वाघ यांचे काल दुःखद निधन झाले .त्यांच्यावर आज अमरधाम नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .अंत्यसंस्कारापूर्वी अंत्यदर्शनासाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या लालटाकी येथील कार्यालयात त्यांचा पार्थिव आणण्यात आला होता. त्यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली .
त्यावेळी पवार बोलत होते .ते पुढे म्हणाले की, रामनाथ वाघ यांचे कार्य चौफेर होते. गेली 60 वर्ष सक्रिय राजकारणात राहून त्यांनी समाजातही जोपासले. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अखंड कार्य केले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या उभारणीत त्यांचा मौलिक वाटा होता. त्यांच्या जाण्याने मी कृतीशील विचारांचा सहकारी गमावला असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे म्हणाले की, रामनाथ वाघे अत्यंत कडक शिस्तीचे होते .संस्थेच्या उभारणीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते .त्यांनी केलेले कार्य आमच्या कायम स्मरणात राहील यावेळी खासदार सुजय विखे, आमदार सुधीर तांबे, आमदार संग्राम जगताप ,माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, साहेबराव दरेकर, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जे. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, सदस्य दीपलक्ष्मी म्हसे, सिताराम खिलारी, चंद्रकांत मोरे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, कॉम्रेड सुभाष लांडे ,ज्येष्ठ समाजसेवक पोपटराव पवार, माजी आमदार चंद्रशेखर कदम,बार असोसिएशन जिल्हा अध्यक्ष सुभाष काकडे ,हिंद सेवा मंडळ मंडळाचे सदस्य डॉक्टर पारस कोठारी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, सुभाष पाटील प्राचार्य भास्करराव झावरे, प्राचार्य तांबे, प्राचार्य दोडके यांची भाषणे झाली.
यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर अमरधाम येथे झालेल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अनिल राठोड ,माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती रामदास भोर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण पाटील कडू, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, चंद्रकांत मस्के अंबिका महीला बॅंकेचे अध्यक्ष संध्या जाधव, रावसाहेब गडाख, शाम पठारे, हर्षदाताई काकडे ,खासेराव शितोळे, अनिल कराळे, शिवाजीराव भोर, भगवानराव बेरड़,बन्सीभाऊ मस्के, गोविंद मोकाटे ,डॉ.राजेंद्र बोरा ,पवन नाईक ,डॉक्टर अभिजित पाठक ,शरद नवले,सुधीर मेहता, कल्याण खेतमाळीस,शिवाजीराव भोर,बाळासाहेब भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांब,े माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, घनश्याम शेलार, सुजित झावरे ,डॉक्टर विवेक भापकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.