मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
त्यांच्या या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचासह राम कदम यांनीही ट्विट करत राऊतांच्या खरपूस समाचार घेतालय. तसेच राऊत आक्रमक झाल्याचे दिसुन आले. आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, अशी धमकी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिली. तर जर मला जेल मध्ये जावं लागलं तर बाजूच्या कोठडीत तुम्ही असाल असा इशाराही राऊतांनी दिलाय. यावर भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊतांनी धमकी देण्यापूर्वी स्वतःची ‘औकात’ काय याचा विचार करावा, असे प्रत्युत्तर दिले पत्रकरांशी बोलतांना दिले आहे.
नेमकं काय म्हणाले राम कदम
जिसने कुछ गलत किया नहीं ,
उसे किसी का डर नहीं सताता !
It’s clearly evident that some leaders of MVA are scared. If they have not done any financial scam ? then why are they scared ?
राजेश खन्ना के अंदाज में ..
ये पब्लिक है सब जानती है!अतः
सत्य मेव जयते ! https://t.co/zQf2IWZPKZ— Ram Kadam (@ramkadam) February 9, 2022