Raj Thackeray on pawar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं.
राष्ट्रवादी म्हणजे निवडून आलेल्या लोकांची मोळी Raj Thackeray on pawar |
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी,” भाजप १९५२ मध्ये स्थापन झालेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष आला. परंतु राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही. ती निवडून आलेल्या लोकांची मोळी आहे. शरद पवार आजपर्यंत हेच करत आहे. जे जे निवडून येतात त्यांना सोबत घेतात आणि सांगतात हा माझा पक्ष आहे. वेगळे झाले तरी निवडून येणारेच. खऱ्या अर्थाने कोणते पक्ष स्थापन झाले असेल तर त्यात जनसंघ, शिवसेना आणि मनसे यांचे नाव घ्यावे लागणार आहे. या पक्षामधील नव्याण्णव टक्के लोकांचा राजकारणाशी कधीच संबंध नव्हता.
अनेकजण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हते. ते मनसेत आले. हजारो तरुण, तरुणी असे या पक्षात आले. ते नावारुपाला आले आहेत. तुमच्यातील अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील. पण त्यात तुमचा पेशन्स महत्त्वाचा आहे, असे मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
काही गोष्टी स्ट्रॅटेजीचा भाग Raj Thackeray on pawar |
आपल्याकडे विचार करणं हे काम आहे. हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ करू त्यालाच मेहनत मानतात. पण विचार करणं याला मेहनत मानत नाही. काही गोष्टी स्ट्रॅटेजीचा भाग असतो. काही वेळा काही गोष्टी सांगता येत नाही. नशिब महाराजांच्या वेळी सोशल मीडिया नव्हता. आजचे पत्रकारही नव्हते, असा टोला राज ठाकरे यांनी सोशल मीडियातील चर्चेबाबत केला.