वर्ष 2018-19 मध्ये रेल्वे अपघातांमध्ये 16, 2017-2018 मध्ये 28 आणि 2016-2017 मध्ये 195 लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 1990- 1995 दरम्यान सरासरी 500 हून अधिक अपघात घडले होते. यावेळेस 2,400 लोक मरण पावले आणि 4,300 लोक जखमी झाले. यानंतर, 2013-2018 दरम्यान सरासरी 110 अपघात घडले ज्यामध्ये 900 लोक मरण पावले आणि 1500 लोक जखमी झाले.
रेल्वेने म्हटले आहे की, 2019 मध्ये रेल्वे अपघातात कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू न झाल्याचे श्रेय रेल्वेने घेतलेल्या अनेक निर्णयांना जाते. यामध्ये मेगा ब्लॉक्स आणि देखभाल करण्यासाठी आधुनिक मशीन्सचा वापर, सर्व मानव रहित क्रॉसिंग काढून टाकणे आणि अशाच प्रकारच्या अनेक उपायांचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या दाव्यावर तेजस्वी यादव यांनी प्रश्न उपस्थित करतांना बिहारमधील सीमांचल एक्स्प्रेसच्या अपघाताची घटना सांगितली ज्यात 7 प्रवासी ठार आणि 24 जण जखमी झाले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ही घटना घडली होती. पीयूष गोयल यांनीही या अपघाताची भरपाई जाहीर केली होती. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की पीयूष गोयल यांनी 1 एप्रिल ते पुढील वर्षी 31 मार्च या आर्थिक वर्षाचा उल्लेख केला आहे. हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अद्याप 3 महिने शिल्लक आहेत.
सुरक्षित सफर की ओर अग्रसर भारतीय रेल
भारतीय रेलवे के 166 साल के लंबे इतिहास में ऐसा पहली बार हुआ कि वित्त वर्ष 2019-20 में अभी तक ट्रेन दुर्घटना में किसी भी यात्री की जान नहीं गई। pic.twitter.com/6n7EVIa4we
— BJP (@BJP4India) December 27, 2019
Dear RM, I remember one such accident in Bihar wherein 6 people had lost their lives due to accident. FYI & A..https://t.co/llItFtlctH https://t.co/YtaaJkvoVz
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) December 25, 2019