पुणे : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात केवळ २५ दिवसांत १० सामने खेळणार आहे. यदांच्या वर्षात देखील संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त होते. आता २०२० मध्येही संघाला सातत्याने सामने खेळावे लागणार असून त्यासाठी बराच प्रवासही करावा लागणार आहे.
श्रीलंका व आॅस्ट्रेलिया यांच्याविरूध्द टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय संघ मायदेशातच खेळणार आहे. त्यानंतर संघ न्यूझीलंडला रवाना होणार असून त्यांच्याविरूध्दही संघ ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल.
श्रीलंकेचा संघ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौ-यावर येत आहे. या मालिकेची सुरूवात ५ जानेवारीपासून होत आहे.
श्रीलंकेविरूध्द टी-२० मालिका
१) पहिली टी-२० (गुवाहटी) : ५ जानेवारी
२) दुसरी टी-२० (इंदूर) : ७ जानेवारी
३) तिसरी टी-२० (पुणे) : ९ जानेवारी
श्रीलंकेनंतर आॅस्ट्रेलियाचा संघ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौ-यावर येत आहे. या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरूवात १४ जानेवारीपासून होत आहे.
आॅस्ट्रेलियाविरूध्दची वन-डे मालिका
१) पहिला सामना (मुंबई) : १४ जानेवारी
२) दुसरा सामना (राजकोट) : १७ जानेवारी
३) तिसरा सामना (बेंगळूरू) : १९ जानेवारी
आॅस्ट्रेलियाविरूध्दची एकदिवसीय मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौ-यावर जात आहे. या दौ-यात भारत पाच टी-२०, तीन वन-डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
न्यूझीलंडविरूध्दची टी-२० मालिका
१) पहिली टी-२०(आॅकलंड) : २४ जानेवारी
२) दुसरी टी-२० (आॅकलंड) : २६ जानेवारी
३) तिसरी टी-२० (हॅमिलटन) : २९ जानेवारी
४) चौथी टी-२० (वेलिंग्टन) : ३१ जानेवारी