मुंबई – महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाने रविवारी मुंबई आणि दिल्लीच्या दिशेने आगेकूच केली आहे, असे या विभागाने सांगितले. हवामान खात्याने पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 104 मिमी आणि पूर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 123 मिमी आणि 139 मिमी पाऊस झाला आहे.आज आणि उद्याही मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने मुंबईतील अंधेरी भुयारी मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
तेथील वाहतूक स्वामी विवेकानंद रस्त्यावर वळवण्यात आली. पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा जोर हळूहळू वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.