नवी दिल्ली – राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुवाहाटी शहराच्या नजिक पोहचली परंतु या यात्रेला शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश नाकारण्यात आला असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात बॅरिकेट्स लाऊन ही यात्रा अडवली. यावेळी पोलिस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष उद्भवला. या संघर्षाचा व्हिडीओ कॉंग्रेसने सोशलमिडीयावर पोस्ट केल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात प्रक्षोभ माजवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. ही यात्रा अडवण्याचा किंवा ती उधळून लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी यात्रा थांबणार नांही आणि आम्ही झुकणार नाही असा निर्धार कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे.
पोलिसांची परिसरात मोठी नाकेबंदी
गुवाहाटी शहराच्या मध्यभागी यात्रेला परवानगी नव्हती त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पण तरीही काँग्रेस कार्यकर्ते पोलीस बॅरिकेडिंग तोडून गुवाहाटी शहरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी राहुल गांधी बसच्या छतावर उभे राहून आपल्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसले.कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, देशाच्या गृहमंत्र्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोेन करून यात्रा अडवण्याचा आदेश दिला आहे. आम्हाला येथील विद्यार्थ्यांशीही बोलू दिले जात नाही. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे पण कोणत्याही विद्यार्थ्याने घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते ऐकू दिले पाहिजे.
आज असम में ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ को पुलिस ने बैरिकेड लगाकर रोक दिया।
न्याय यात्रा से बौखलाए तानाशाह और उसके डरे-सहमे प्यादे के इशारों पर जारी इस अन्याय का कांग्रेस के साथियों ने जमकर विरोध किया।
इस बीच असम पुलिस और BJP के गुंडों ने असम कांग्रेस अध्यक्ष @BhupenKBorah जी के… pic.twitter.com/vDr8XgPS6n
— Congress (@INCIndia) January 23, 2024
पण आसाममधील कोणत्याही शाळा आणि महाविद्यालयात असे घडत नाही. तुम्हाला तुमची भाषा बोलता येणार नाही असे सांगितले जात आहे. तुम्हाला तुमचा इतिहास सांगण्याचाही मज्जाव आहे असे ते म्हणाले.