नवी दिल्ली – लोकसभा सदस्य म्हणून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची अपात्रता म्हणजे न्यायालयीन आदेशाचा परिणाम आहे. त्यामागे कुठला राजकीय स्वरूपाचा निर्णय नाही, अशी भूमिका भाजपने शुक्रवारी मांडली.
राहुल यांच्या विषयीचा निर्णय कायदेशीर स्वरूपाचा आहे. राजकीय पक्षाने नव्हे; तर न्यायालयाने तो निर्णय दिला आहे. कुणाच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत ते कॉंग्रेसने स्पष्ट करावे, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले.
राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर; कपिल सिब्बल यांचा आरोप
राहुल यांची अपात्रता कायदेशीर आहे. कायद्यासमोर सगळेच समान आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस.पी.एस.बघेल यांनी दिली. त्यातून राहुल यांच्या अपात्रतेशी भाजपचे देणे-घेणे नसल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.