नवी दिल्ली : – राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर केला जातो आणि या बाबतीत प्रक्रिया आणि निकाल हे दोन्ही प्रकार “विचित्र आहेत असे मत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांना झालेल्या दोन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेच्या संबंधात मत व्यक्त करताना ते बोलत होते.
सिब्बल म्हणाले, राहुल गांधी यांना मानहानीसाठी 2 वर्षांची शिक्षा झाली आहे. अलिकडच्या काळात राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर केला जाऊ लागला आहे. त्याची प्रक्रिया आणि निकाल दोन्ही विचित्र आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi Disqualified : अगोदर आजी आणि आता नातू….48 वर्षांनंतर गांधी कुटुंबाला धक्का
सिब्बल हे कॉंग्रेसच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत पण त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी गेल्या मे महिन्यात कॉंग्रेस सोडून ते समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत निवडून आले होते. त्यांनी या प्रकरणात राहुल गांधी यांच्या विषयी सहानुभूती व्यक्त करून त्यांना समर्थनही दिले आहे.