Rahul Gandhi On Pinarayi Vijayan – धार्मिक गोष्टींचे आचरण करणे या पूर्णपणे व्यक्तिगत गोष्टी आहेत. मंदिरात जाणे, प्रार्थना करणे, भजन गाणे ही वैयक्तिक निवड आहे. आमचा याला विरोध नाही. मात्र, अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना आसाममध्ये नागाव येथे काॅंग्रेस नेते राहूल गांधी एका मंदिराबाहेर निदर्शने करत होते.
यामागचे कारण मला तरी कळले नाही, अशा शब्दांत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राहूल गांधींसह काॅंग्रेसवर टीका केली आहे.मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या निष्ठेबद्दल अनिश्चिततेवर प्रकाश टाकला आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कन्नूरमध्ये अझिक्कोडन स्मारकाची पायाभरणी करताना विजयन म्हणाले, ‘काँग्रेस नेतृत्वाला खात्री नाही की उद्या त्यांचे नेते पक्षात असतील की नाही. गेल्या महिन्यात अयोध्येत झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाबाबत विजयन म्हणाले की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले होते.
तर काँग्रेसने निर्णय घेण्यासाठी वेळ घेतला होता. आम्ही ते निमंत्रण आमच्या विचारधारेला अनुसरुन नकारले होते; मात्र आम्ही कोणाच्याही धार्मिक स्वातंत्र्य आणि निष्ठांवर प्रहार केले नाहीत. । Rahul Gandhi On Pinarayi Vijayan
त्त्यामुळे आमच्या मते, केवळ डावे पक्षच ‘संघ परिवारा’च्या विचारसरणीचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यास सक्षम आहेत, काँग्रेस नाही. काॅंग्रेसचे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व फसवे आहे. देशाला प्रभावित करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसची स्पष्ट भूमिका नसल्याची टीका विजयन यांनी केली.
ते म्हणाले, ‘अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाची भूमिका पंडित नेहरूंसारखी स्पष्ट नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला कमकुवत झाला असून हिंदुत्ववादी जातीयवादी शक्तींनी त्याचा गैरफायदा घेतला आहे. । Rahul Gandhi On Pinarayi Vijayan