नवी दिल्ली – जगातील तब्बल शंभरहून अधिक देशात करोना व्हायरसने आता भारतात प्रवेश केला आहे. करोनाचा भारतात पहिला मृत्यू झाला. शिवाय करोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल ७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, करोना व्हायरस गंभीर समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने निराकरण होणार नाही. यावर लवकरात-लवकर उपाय काढला नाहीतर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. पण, सरकार शुद्धीत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
I will keep repeating this.
The #coronavirus is a huge problem. Ignoring the problem is a non solution. The Indian economy will be destroyed if strong action is not taken. The government is in a stupor. https://t.co/SuEvqMFbQd
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 13, 2020
दरम्यान, राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.