नवी दिल्ली – सत्ताधारी पक्षच सभागृहात गोंधळ घालत असल्याचे प्रथमच दिसत आहे. कारण भाजपला संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यात रस नाही. नको त्या क्षुल्लक विषयांवर सत्ताधारी पक्ष घोषणाबाजी करत आहेत. राहुल गांधींनी माफी मागावी, असे त्यांनी काहीच केलेले नाही. कारण पंतप्रधानांनी यापूर्वी देशाबाहेर देशाबद्दल अवमानास्पद वक्तव्ये केली आहेत, असे प्रतिपादन तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, राहुल गांधी कुठेतरी काहीतरी बोलले आहेत, मग त्याला संसदेत मुद्दा का बनवला जात आहे. सभागृहात हे लोक त्यांना देशद्रोही म्हणत आहेत. ते जर देशद्रोही असेल तर तुमचे सरकारही देशद्रोही आहे. सरकार राहूल गांधींना अटक का करत नाही? तुम्ही त्यांना का पकडत नाही? तुमच्याकडे सर्व एजन्सीज आहेत. त्याचा गैरवापर होत आहे. मग तुम्ही कारवाई का करत नाही?
संसदेचे कामकाज चालू नये यासाठी सत्ताधारी पक्षाचे मित्रच वादग्रस्त मुद्दे उपस्थित करत आहेत. लवकरच 9 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. खरी लिटमस चाचणी होईल. संसदेतून काही गोष्टी निघाल्या तर त्या खूप दूर जातील. यावेळी संसदेचे कामकाज चालण्यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही, असेही सिन्हा म्हणाले.
Manish Sisodia : सिसोदियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; भ्रष्टाचाराचा ‘हा’ नवा आरोप
खुद्द पंतप्रधानांना तपास यंत्रणेचा अनुभव आहे. लोक विचारत आहेत की विरोधकांसोबत असे का होत आहे? विरोधी पक्षाच्या नेत्यांना का टार्गेट केले जात आहे? आमच्यासारखे लोक खूप भाग्यवान आहेत की ते आतापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर राहिले कारण आम्ही स्वतःला शुद्ध ठेवले आहे. सर्व पक्षांबाबत बोलायचे झाले तर बहुतांश विरोधी पक्षांचे लोक एकत्र आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.